Latur : नाफेड केंद्रांवर सोयाबीन खरेदी होईना; खरेदी सुरु होण्याच्या प्रतीक्षेत शेतकरी गेटवरच

Latur News : लातूर जिल्ह्यात जवळपास १६ ठिकाणी शासनाच्या वतीने हमीभाव केंद्र सुरू करण्यात आली आहेत. मात्र मागच्या काही दिवसापासून खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांचे सोयाबीन उतरून घेतलं जात नाही
Latur News
Latur NewsSaam tv
Published On

संदीप भोसले 

लातूर : नाफेडच्या सोयाबीन हमीभाव केंद्रावर शेतकऱ्यांची हेळसांड होत असल्याचे समोर आले आहे. सोयाबीन खरेदीसाठी तारीख येऊनही सोयाबीन खरेदी केलं जात नाही. नाफेड केंद्रांवर अचानक सोयाबीन खरेदी बंद केल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. दरम्यान बारदाना अभावी खरेदी होत नसल्याने शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेला सोयाबीन खरेदी केंद्राच्या गेटवरच ठेवण्यात आलेला आहे. 

लातूर जिल्ह्यात जवळपास १६ ठिकाणी शासनाच्या वतीने हमीभाव केंद्र सुरू करण्यात आली आहेत. मात्र मागच्या काही दिवसापासून खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांचे सोयाबीन उतरून घेतलं जात नाही. बारदाना अभावी शेतकऱ्यांच्या सोयाबीनच्या गाड्या खरेदी केंद्राच्या दारातच लावून आहेत. अनेक वेळा तारीख येऊनही सोयाबीन विक्री होत नसल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. आपला सोयाबीनचा माल घेऊन शेतकरी खरेदी केंद्राच्या बाहेरच आहे. 

Latur News
Navapur News : कोंडाईबारी घाटात हातपाय बांधलेल्या स्थितीत आढळला तरुणाचा मृतदेह; चार दिवसांपासून होता बेपत्ता

आडत दुकानातही हमीभाव मिळावा 

साधारण दोन आठवड्यांपासून बारदाना अभावी नाफेड केंद्रांवरील सोयाबीनची खरेदी थांबविण्यात आली आहे. अजून देखील यावर तोडगा निघाला नसल्याने सोयाबीन खरेदीची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे. त्यामुळे हमीभाव केंद्राप्रमाणे मार्केट मधील आडत दुकानांनाही हमीभावप्रमाणे सोयाबीनला दर देण्यासाठी शासनाने आदेश लागू करावा; अशी मागणी शेतकरी करत आहेत.

Latur News
Nandurbar Palika : मालमत्ता कर न भरल्याने ३५ हून अधिक दुकानांना सील; नंदुरबार पालिकेची कर वसुली मोहीम

भाव मिळत नसल्याने शेतातच सोयाबीनची सुडी
हिंगोली
: शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांची मोठी कोंडी निर्माण झाली आहे. हिंगोलीच्या ईसापुर गावातील शेतकरी दत्तराव जगताप यांनी सोयाबीनला भाव मिळत नसल्याने मागील चार महिन्यांपासून शेतातील सोयाबीन मळणी यंत्रातून न काढता शेतातच साठवणूक करून ठेवले आहे. ऊन, वारा, पाऊस यापासून चार महिने संरक्षण करून देखील सोयाबीनला बाजारात भाव मिळत नसल्याने अखेर त्यांनी मळणी यंत्रातून सोयाबीन काढण्याचा मुहूर्त शोधत स्वस्त दरात सोयाबीन विक्री केली आहे, यावेळी जगताप यांनी सरकार विरोधात संताप व्यक्त करत शेतकऱ्यांना जिवंत ठेवायच असेल तर आमच्या मालाला योग्य भाव द्या अशी मागणी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com