नापिकी अन् कर्जाचा बोजा; शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल
एरंडोल (जळगाव) : सततची नापिकीमुळे खासगी सावकाराकडून घेतलेले कर्ज फेडायचे कसे? या आर्थिक विवंचनेत असलेले (Erandol) कासोदा दरवाजा परिसरातील वयोवृद्ध शेतकरी (farmer) नीळकंठ महादू खैरनार (वय ७४) यांनी रविवारी (ता. ६) दुपारी दीडच्या सुमारास शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. (Breaking Marathi News)
नीळकंठ खैरनार हे सततच्या नापिकीला कंटाळून अनेक (Jalgaon) दिवसांपासून चिंताग्रस्त होते. त्यांनी खासगी सावकाराकडून देखील कर्ज घेतले होते. पिकांच्या नुकसानीमुळे कर्ज कसे फेडायचे, या विवंचनेत ते होते. त्यांचा मुलगा विनोद खैरनार (Surat) सुरतला असतो, दिवाळीनिमित्त तो एरंडोल येथे वडिलांकडे आला आहे. दीडच्या सुमारास विनोद खैरनार घरी असताना धीरज भोई यांनी नीळकंठ खैरनार यांनी पंकज कांबरे यांच्या शेतात झाडाला गळफास घेतला असल्याचे सांगितले.
विनोद खैरनार यांनी धीरज भोई, गोपाल पाटील, धनराज गुजर, बाळा वंजारी यांच्यासह शेताकडे धाव घेतली असता नीळकंठ खैरनार हे झाडाला गळफास घेऊन लटकलेले दिसले. शरद खैरनार यांनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुनील लोहार, अनिल पाटील तपास करीत आहेत.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.