जळगाव : चोपडा शहरासह तालुक्यात अचानक आलेल्या वादळामुळे नागरिकांसह शेतकऱ्यांची (Farmer) धावपळ झाली. मात्र शेतातील उभे असलेले पीक वादळामुळे जमिनीवर आडवे पडले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर (Jalgaon News) नुकसान झाले आहे. (Tajya Batmya)
शेतात उभे असलेले पीक जमिनीवर आडवे पडलेले पाहून शेतकऱ्यांना सांगताना अश्रू अनावर झाले. शेतातील पीक डोळ्यासमोर आडवे पडलेले पाहून शेतासाठी लागलेला खर्च कसा निघेल? या संकटात सापडला आहे. तर काही दिवसांपूर्वी जिल्हा बँकेकडून शेतकऱ्यांना मालमत्ता जप्तीची नोटीस आल्याने ते टेन्शन असताना या वादळामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे.
आता कर्जफेडीची चिंता
शेतातून निघणाऱ्या या उत्पन्नातून कर्ज फेडले गेले असते. कमीत कमी त्या कर्जावरील व्याज तरी फेडले गेले असते, अशी व्यथा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी बोलून दाखवली. शासनाने तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी मागणी यावेळी शेतकरी करीत आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.