Hingoli News : अवकाळीने हरभरा पिक गेले खरडून; पाच एकर पिकावर शेतकऱ्याने फिरवला रोटर

Hingoli News : रब्बी हंगामात हरभरा पीक प्रामुख्याने घेतले जात असते. त्याला जास्त पावसाची आवश्यकता नसते
Hingoli News
Hingoli NewsSaam tv
Published On

हिंगोली : अवकाळी पावसाने सर्वच पिकांचे प्रचंड नुकसान केले आहे. यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. यात रब्बी हंगामात (Hingoli) लागवड केलेल्या हरभरा पिकाचे देखील नुकसान झाले आहे. हरभऱ्याच्या जास्त पाण्याची गरज नसते. परंतु अवकाळी पावसामुळे हरभरा खरडून गेल्याने (Farmer) शेतकऱ्याने रोटोव्हेटर केले. (Maharashtra News)

Hingoli News
Maharashtra Politics: राज्य मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला, भावी मंत्र्यांमध्ये आनंदाची लाट; कुणाला मिळणार संधी?

रब्बी हंगामात हरभरा पीक प्रामुख्याने घेतले जात असते. त्याला जास्त (Rain) पावसाची आवश्यकता नसते. मात्र हिवाळ्यात हरभरा शेतीमधून अवकाळी पावसाचे पाणी वाहित्यामुळे पीक खरडून गेलं. तर उर्वरित पिकावर हिरव्या रंगाच्या अळ्यानी आक्रमण केले. त्यामुळे शेतात काहीच पीक शिल्लक राहिले नसल्याने अखेर या (Farmer) शेतकऱ्याने रोटावेटर फिरवून दुसऱ्या पिकासाठी शेतीची मशागत सुरू केली आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Hingoli News
Crop Insurance : लाखभर शेतकऱ्यांनी काढला ज्वारीचा विमा; परभणी जिल्ह्यात शेतकऱ्यांचा प्रतिसाद

पाच एकरावरील हरभरा वाया 

हिंगोलीच्या औंढा तालुक्यातील गलांडी शिवारात अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या पाच एकर वरील हरभरा पिकावर शेतकऱ्याने रोटावेटर फिरवला. प्रमोद देव असे या शेतकऱ्याचे नाव असून देव यांचे अवकाळी पावसाने मोठे नुकसान झाले आहे. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com