भूषण अहिरे/ अजय सोनवणे
धुळे/ नाशिक : फेंगल चक्रीवादळामुळे वातावरणात बदल होत असल्याचे पाहण्यास मिळत आहे. मागील आठवड्यात ढगाळ वातावरण निर्माण होऊन काही ठिकाणी पाऊस देखील झाला. सातत्याने बदलत असलेल्या वातावरणाचा परिणाम रब्बी हंगामातील शेती पिकांवर होताना दिसून येत आहे. यामुळे शेतकरी संकटात सापडला असून रोगराई कमी करण्यासाठी औषधी खरेदी करत आहे.
नाशिक जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पाऊस व ढगाळ वातावरण आहे. या बदलत्या हवामानामुळे शेती पिकांवर रोगांचा प्रार्दुभाव वाढत असल्याने बळीराजा धास्तावला आहे. दरम्यान कांदा, द्राक्ष, हरभरा या पिकांना वातावरणाचा फटका बसत असल्याने शेतकऱ्यांची पिकांवरील रोगांचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी कृषी सेवा केंद्रावर महागडी औषधे खरेदीसाठी शेतक-यांची गर्दी होऊ लागली आहे.
धुळे जिल्ह्यात देखील गेल्या आठवड्यापासून होत असलेल्या हवामानातील बदलाचा परिणाम रब्बी पिकांवर दिसून येत आहे. अरबी समुद्रात आलेल्या फेंगल चक्रीवादळाचा प्रभाव राज्यातील अनेक भागात दिसून येत आहे. फेंगल चक्रीवादळाने ढगाळ वातावरण निर्माण झाले असून वातावरणातील बदलाचा रब्बी पिकांना मोठा फटका बसणार आहे. यामुळे धुळे जिल्ह्यात तुर, कापूससह गहू, हरभरा ही रब्बी पिके धोक्यात सापडली आहेत.
दरम्यान ढगाळ वातावरण काही दिवस राहणार असून पुन्हा एकदा लवकरच थंडी परतायला सुरूवात होईल; असा विश्वास कृषी तज्ञांनी व्यक्त केला आहे. शेतकऱ्यांनी वातावरणातील बदलास घाबरून न जाता योग्य पद्धतीने पिकांची काळजी घ्यावी असा सल्ला कृषी तज्ञांनी दिला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.