Crop Insurance : खरीप २०२२ च्या हंगामातील २३२ कोटींचा पिकविमा मिळणार; २५ जानेवारीपर्यंत थेट खात्यात रक्कम

Dharashiv News : भारतीय कृषी विमा कंपनीने धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना केवळ ५० टक्के २३२ कोटी रक्कम दिली होती. याविरोधात याचिकाकर्ते शेतकरी अनिल जगताप यांनी तक्रार दाखल केली होती.
Crop Insurance
Crop InsuranceSaam tv
Published On

बालाजी सुरवसे 

धाराशिव : धाराशिव जिल्ह्यातील खरीप २०२२ च्या हंगामातील उर्वरीत २३२ कोटी रुपये रक्कम देण्यास (Dharashiv) भारतीय कृषी विमा कंपनी तयार झाली. तसे पत्र जिल्हाधिकारी यांना दिले आहे. दीड वर्षाच्या कालावधीनंतर विमा कंपनीचा (Crop INsurance) हा परतावा मिळत आहे. (Tajya Batmya)

Crop Insurance
Bhandara News : कंटेनरमधून ४० गोवंशाची सुटका; जुने व नवीन गोवंश तस्कर पुन्हा सक्रिय, साकोली पोलीसांची कारवाई

केंद्रीय परिपत्रकाचा चुकीचा अर्थ काढुन भारतीय कृषी विमा कंपनीने धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना केवळ ५० टक्के २३२ कोटी रक्कम दिली होती. याविरोधात याचिकाकर्ते शेतकरी (Farmer) अनिल जगताप यांनी तक्रार दाखल केली होती. दरम्यान यामध्ये जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी कंपनी (Crop Insurance Company) विरोधात आरआरसी कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू केल्यानंतर कंपनीला अखेर जाग आली. कंपनी उर्वरित २३२ कोटी रुपये देण्यास तयार झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पीकविमा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.  

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Crop Insurance
Bribe Trap : वीज बिलाच्या दंडाच्या रकमेत तडजोडीसाठी घेतली लाच; १ लाख स्वीकारताना वायरमन ताब्यात

२५ जानेवारीपर्यंत खात्यावर रक्कम 

दीड वर्षाच्या कालावधीनंतर विम्याचा परतावा मिळत आहे. दरम्यान शेतकऱ्यांच्या खात्यावर २५ जानेवारीपर्यंत ही रक्कम जमा होईल; अशी माहीती जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी रविंद्र माने यांनी दिलीय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com