
अमर घटारे
अमरावती : फळ पिकाची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांनी फळपीक विमा उतरविला आहे. अर्थात नुकसान झाल्यानंतर त्याची भरपाई शेतकऱ्याला मिळेल. मात्र (Amravati) अमरावती जिल्ह्यात संत्र्याचे मोठे नुकसान झाल्यानंतर देखील शेतकऱ्यांना (Farmer) भरपाई मिळू शकलेली नाही. यामुळे शेतकरी आक्रमक झाले असून त्यांनी पीक विम्याच्या प्रतिनिधीलाच ताब्यात घेतले आहे. (Live Marathi News)
अमरावती जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर फळ पिकांचे नुकसान झाले आहे. यात सर्वाधिक संत्र्याच नुकसान झाले असून शेतकऱ्यांना पिक विमा मिळणे अपेक्षित होतं. मात्र दिवाळी उलटूनही शेतकऱ्यांना पिक विम्याची रक्कम मिळाली नाही. त्यामुळे लोकविकास शेतकरी संघटनेमार्फत अमरावती जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयात शेतकऱ्यांनी एकत्र या ठिकाणी (Crop Insurance) पीक विम्याच्या जिल्हा प्रतिनिधीला बोलावलं. शेतकऱ्यांनी आक्रमक होत पिक विम्याच्या जिल्हा प्रतिनिधीला या ठिकाणी दोन तासापेक्षा जास्त काळ डांबून ठेवलं,
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
विम्याची रक्कम मिळावी
तीन हजार १५६ शेतकऱ्यांना फळपीकाचा १० कोटी ७१ लाख रुपयांचा फळ पिक विमा मंजूर झाला आहे. मात्र तो अजुनपर्यंत मिळाला नसल्याने फळ पिक विमा मिळणार नाही; तोपर्यंत जिल्हा कृषी अधिकाऱ्याला कार्यालयातून व पिक विम्याच्या जिल्हा प्रतिनिधीला कार्यालयाच्या बाहेर जाऊ देणार नाही. अशी भूमिका शेतकऱ्यांनी मांडली आहे. दरम्यान यावेळी पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आला आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.