पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना' जाहीर केली असून या योजनेचा लाभ देशभरातील कोट्यवधी युवकांना मिळणार आहे. या योजनेअंतर्गत तरुणांना १५ हजार रुपये सहाय्य म्हणून देण्यात येणार आहे.
मात्र, ही घोषणा २०१४ मध्ये केलेल्या १५ लाखांच्या घोषणेसारखी फसवी ठरू नये अशीही युवकांची अपेक्षा आहे. १५ लाख रुपये खात्यात आले नाहीत, तशीच १५ हजारांची योजना होऊ नये म्हणजे झालं, अशी प्रतिक्रिया अनेक तरुणांनी व्यक्त केली.
युवकांनी योजनेतील मिळणाऱ्या रकमेचा योग्य उपयोग करून नोकरी, कौशल्यविकास आणि रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी खर्च करावा अशी अपेक्षा आहे. या पैशाचा वापर व्यसनांसाठी न करता चांगल्या कामासाठीच व्हावा, असे मतही युवकांकडून व्यक्त होत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.