भारत-पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी, अमेरिकेनेच मध्यस्थी का केली?Explainer Video

India- pakistan ceasefire : भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये शस्त्रसंधीवर सहमती झाली. त्यासाठी अमेरिकेनं मध्यस्थी केली. पण दोन देशांमधील संघर्ष थांबवण्यासाठी अमेरिकेनेच मध्यस्थी का केली? त्यासंदर्भातील विश्लेषण.

अखेर दोन देशातील म्हणजेच भारत आणि पाकिस्तानमधील युद्धाला विराम लागला आहे. याबाबतची माहिती अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या एक्स अकाऊंटवर ट्विट करत दिली. पाकिस्तानने पोसलेल्या दहशतवाद्यांनी 22 एप्रिल रोजी भारताचे नंदनवन असलेल्या काश्मीर येथील पहलगाममध्ये आपल्या माय भगिनींचे कुंकू पुसले होते.

यानंतर संपूर्ण देशाचे रक्त खवळले, आणि काही दिवसातच भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानी दहशतवाद्यांना यमसदनी धाडले. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली. या सर्व प्रकरणात जगातील बलाढ्य देश असणाऱ्या अमेरिकेने मध्यस्थी करत या संघर्षाला अखेर विराम दिला.

याबाबत सकाळ माध्यम समूहाचे संपादक डॉ निलेश खरे यांनी विश्लेषण केले. भारत आणि पाकिस्तानमधील या युद्धजन्य परिस्थितीला विराम लागला असला तरी भारताने काही अटी-शर्ती लावल्या आहे. जर येणाऱ्या काळात पुन्हा पाकिस्तानने दहशतवाद्यांच्या मदतीने काश्मीरवर हल्ला केला तर हे युद्धा मानले जाईल अशी सक्त ताकीद भारताने दिली आहे.

मागच्या 48 तासांपासून पाकिस्तानमध्ये महागाईचे दर हे गगनाला भिडले होते. पेट्रोल पंप बंद करून साठा वाचवला जात होता. तसेच IMA कडे पाकिस्तानने गुडघे टेकवत भीक मागायला सुरुवात केली होती. पाकिस्तानच्या एका वृत्तपत्रानुसार त्या देशात खाण्याचे वांदे सुरू होण्याची भीती होती. यामुळे कुठेतरी अमेरिकेने दयेची भीक घालत यावर चर्चा केली आणि युद्धाला विराम दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com