Washim News: अखेर त्या 5 जणांना पुरातून सुखरूप बाहेर काढले, पाहा VIDEO

Washim Flood Rescue: वाशिम जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे पैनगंगा आणि उतावळी नद्यांना पूर आला असून वेगवेगळ्या ठिकाणी अडकलेल्या पाच नागरिकांना प्रशासन व नागरिकांच्या मदतीने सुखरूपपणे वाचवण्यात आले.

वाशिम जिल्ह्यात दोन दिवसात झालेल्या मुसळधार पावसाने नदी नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर आला होता. यात वेगवेगळ्या तीन ठिकाणी अडकलेल्या पाच जणांना रेस्क्यू करून वाचवण्यात आले. यात रिसोड तालुक्याच्या पेडगाव येथे पैनगंगा नदीच्या पुरात अडकलेल्या दोन शेतकऱ्यांना रात्री उशिरा सुखरूप बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आले आहे. अक्षय अंभोरे आणि मदन मोरे अशी शेतकऱ्यांची नावे आहेत. हे दोघे शेतकरी शेतात गेले असताना मुसळधार पाऊस सुरू झाला आणि पैनगंगा नदीला मोठा पूर आला. जीव वाचवण्यासाठी दोघे शेतकरी शेतातील एका झाडावर चढले आणि ते दुपारपासून तेथे अडकून पडले होते.

तर दुपारच्या सुमारास कोकसा परिसरात उतावळी नदीला आलेल्या पुरात एक व्यक्ती अडकून पडला होता. त्या व्यक्तीला शिरपूर पोलीस प्रशासन आणि नागरिकांच्या सहकार्याने सुखरूप बाहेर काढण्यात आले. तर उतावळी नदीच्या पुरात जोगेश्वरी शेत शिवारात सुद्धा दोन शेतकरी पुरात अडकून पडले होते यांना सुद्धा शिरपूर पोलीस आणि नागरिकांच्या मदतीने सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे. संत गाडगेबाबा रेस्क्यू टीम, पिंजर यांच्या मदतीने बचाव कार्य सुरू करण्यात आले. बोटीद्वारे बचाव मोहीम राबवून दोन्ही शेतकऱ्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com