पंढरपुर: महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या विठ्ठलाच्या चरणांची झीज झाली आहे. त्यामुळे विठ्ठलाच्या चरणावर वज्रलेप करण्याची गरज आहे. याबाबत पुरातत्त्व विभागाच्या तज्ञांनी विठ्ठल मूर्तीची पाहणीही केली. मात्र याबाबत शासनाच्या विधी व न्याय विभागाकडून परवानगी न मिळाल्याने विठ्ठल मूर्तीचा वज्रलेप रखडल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. यापूर्वी चार वेळा चरणावर लेपन प्रक्रिया करण्यात आली आहे. कोरोना काळात 2020 साली शेवटचा वज्रलेप करण्यात आला होता. त्यानंतर आता देवाच्या चरणाची झीज झाल्याचा प्रकार समोर आला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.