नाशिक जिल्ह्यात दोन दिवस सतत झालेल्या अवकाळी पावसाने पुन्हा शेतपीकांचं मोठं नुकसान झाल्याच हळू हळू पुढे येऊ लागले आहे. नाशिकच्या चांदवड तालुक्यात अतिवृष्टीने आधिच शेतकरी संकटात सापडलेला असतांना आता अवकाळीने शेतात काढून ठेवलेली मका भिजली तर लागवड केलेला कांदा पाण्यात भिजल्याने शेतक-यांचे कंबरडे मोडले आहे. झालेल्या नुकसानीचे पंचनामे करुन भरपाई मिळावी अशी मागणी शेतक-यांनी केलीय. तसेच जिल्ह्यातील कळवण तालूक्यात दोन दिवस झालेल्या पावसाने अभोणा, आंबुर्डी, नरुळ, चणकापूर परिसरात सतत पडलेल्या अवकाळी पावसाने काढणीस आलेली बाजरी,सोयाबीन,भात,कांदा रोपे व लागवड केलेल्या कांद्याला फटका बसला असून पावसाने पिकांचे नुकसान झाले आहे. शासनाने नुकसानीचे पंचनामे करुन करुन भरपाईची मागणी शेतक-यांनी केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.