मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जयकुमार गोरे प्रकरणात केलेल्या आरोपांना सुप्रिया सुळे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या, 'मी देवेंद्र फडणवीस यांचं भाषण ऐकलं नाही. मी संसदीय कामात व्यग्र होते. मला आश्चर्य वाटलंय. माझा मोबाईल पारदर्शक आहे. मी पत्रकारांच्या संपर्कात असते. मला पत्रकारांचे फोन मेसेज येत असतात. मला तुषार खरात यांनाही ओळखते. लोकशाहीत पत्रकार आणि लोकप्रतिनिधीला बोलायला हरकत काय? त्यामुळे मला आश्चर्य वाटलं.
'मी कोणत्याही व्यक्तीबद्दल वैयक्तिक भाष्य केलेलं नाही. माझ्यावर आई-वडील आणि यशवंतराव चव्हाणांचे संस्कार आहेत. या प्रकरणात म्हटलं होते की, एक कोटी रुपयांची रोकड आली कुठून, हे प्रकरण अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यापर्यंत नेणार असल्याचे बोलले होते. नोटबंदीत १ कोटी रुपये कुठून आले? मुख्यमंत्र्यांनी सांगितलेल्या लोकांना मी भेटले नाही. मी पारदर्शक आयुष्य जगते', असे पुढे म्हणाल्या.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.