सुनील तटकरे यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. कसबा गणपतीच्या दर्शनाचा लाभ घेण्याचा योग आला, राज्याला सुख, समृद्धी मिळावी अशीच प्रार्थना केलीय. काल महायुती सरकारने महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे,ओबीसी समजात काही शंका असतील त्या अभ्यास करून कळू शकणार आहेत.
लोकशाहीमध्ये आपलं म्हणणं मांडण्याचा अधिकार आहे,जरुर ओबीसी संघटनेच्या ज्या भावना असतील तर त्याबाबत सरकारने त्यांना माहिती दिली पाहिजे सरकारचे ते कर्तव्य आहे
हा श्रेयवादाचा निर्णय नाही, सर्वांशी चर्चा करून निर्णय घेतला आहे,देवेंद्र फडणवीस राज्याचे नेते आहेत, अजितदादा आणि एकनाथ शिंदे आणि उपसमिती यांच्याशी चर्चा करून हा निर्णय घेतला आहे, फडणवीस हे महायुतीचे नेते आहेत
ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे,हेच सभागृहात आम्ही मांडले होते. हाके बोलतात त्याला प्रतिक्रिया देण्याची गरज नाही, ओबीसी समाजाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याची गरज हिच राष्ट्रवादीची भूमिका काल होती आणि आज पण आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.