IIT Mumbai: आयआयटी बॉम्बेचं नाव बदलून आयआयटी मुंबई करा, शरद पवार गटाची मागणी, मराठी अस्मितेसाठी नामांतर आवश्यक|VIDEO

IIT Bombay Renamed To IIT Mumbai: शरद पवार गटाने आयआयटी बॉम्बेचे नाव बदलून आयआयटी मुंबई करण्याची मागणी करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवले आहे.

शरद पवार गटाने आयआयटी बॉम्बेचे (IIT Bombay) नाव बदलून आयआयटी मुंबई (IIT Mumbai) करण्याची मागणी केली आहे. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ईमेलद्वारे पत्र पाठवण्यात आले आहे. मुंबई हा शब्द केवळ शहराचं नाव नसून मराठी अस्मितेचं प्रतीक आहे असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. संस्थेचे ब्रिटिशकालीन 'बॉम्बे' हे नाव बदलून 'मुंबई' करण्यासाठी शासन स्तरावर तातडीने पुढाकार घ्यावा, अशी मागणी या पत्रातून करण्यात आली आहे. शरद पवार गटाच्या मते, हे नाव बदलणे मराठी अस्मितेसाठी आवश्यक आहे आणि शहराची ओळख कायम ठेवण्यासाठी महत्त्वाचे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com