Sanjay Raut: 2014 साली देश स्वतंत्र म्हणण्यापेक्षा खड्ड्यात गेला; संजय राऊतांचा प्रहार | VIDEO

Sanjay Raut Criticism Of Modi Government: संजय राऊत यांनी नाशिक दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर जोरदार टीका करत 2014 साली देश स्वतंत्र न होता खड्यात गेला, असे विधान केले.
Summary

संजय राऊतांचा नाशिक दौऱ्यात मोदी सरकारवर जोरदार प्रहार

2014 साली देश स्वतंत्र न होता खड्यात गेला, असा आरोप

बेरोजगारी, भूक, कायदा सुव्यवस्था यांसारख्या गंभीर समस्यांकडे लक्ष वेधले

देशाच्या प्रगतीत सर्व पूर्वीच्या नेत्यांचा वाटा असल्याचे मान्य केले

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे आज नाशिक दौऱ्यावर आहे. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरकारवर जोरदार टीका केली. अनेक ठिकाणी झेंडे फडकले आहे, तिरंगा फडकला आहे. आजही आपल्या देशात बेरोजगारी, भूक, कायदा सुव्यवस्था, अंतर्गत सुरक्षा याबाबत गंभीर समस्या आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आता 75 वर्षाचे होतील आणि देशाचे स्वातंत्र्य 79 वर्षाचे झाले आहे. या 79 वर्षात देश नक्कीच प्रगतीप्रथावर गेला आहे. जेव्हा स्वातंत्र्य मिळाले तेव्हा देशामध्ये एक सुई आणि धागा देखील बनत नव्हता. आज तो देश अनेक बाबतीत पुढे गेला आहे. त्याचे या देशाचे नेतृत्व करणाऱ्या सर्व नेत्यांना जाते. काही लोकांना वाटत आहे की, 2014 साली देश स्वतंत्र झाला. पण 2014 साली देश स्वतंत्र म्हणण्यापेक्षा देश खड्यात गेला आहे, असे जोरदार टीकास्त्र संजय राऊत यांनी भाजपवर सोडले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com