'लोकशाही टिकवण्यासाठी एक व्हावं लागेल'; शरद पवार नेमकं काय म्हणाले?

Forget Differences, Protect Democracy Sharad Pawar Strong Message: सत्याचा मोर्चाला शरद पवार यांची उपस्थिती. 'मतदानाचा अधिकार टिकवायचा असेल तर,मतभेद विसरावे लागतील, एकत्र यावं लागेल', शरद पवारांचं आवाहन.

मतदार याद्यांतील घोळ बाहेर काढण्यासाठी महाविकास आघाडी आणि मनसेनं सत्याचा मोर्चा काढला. या मोर्चात महाविकास आघाडी आणि मनसे पक्षातील नेते मंडळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार देखील उपस्थित होते. भाषणेवेळी त्यांनी 'मतदानाचा अधिकार टिकवायचा असेल, तर मतभेद विसरून एकत्र यावं लागेल', असं म्हणाले.

'सातत्याने सत्तेचा गैरवापर केला जातोय. या सगळ्या गोष्टीला तोंड द्यावं लागेल. राजकीय मतभेद असू शकतात, पण या सगळ्या गोष्टी विसरून आपल्याला एक व्हावं लागेल. लोकशाहीचा अधिकार जतन करावं लागेल', असं शरद पवार म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com