भिवंडी लोकसभा मतदार संघाचे खासदार सुरेश म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली लोकनेते दिबा पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून भिवंडी ते जासई असा नवी मुंबई मार्गे दि बा मानवंदना कार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
या रॅलीतून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचे नाव देण्याची मागणी केंद्र आणि राज्य सरकारसमोर करण्यात आली. खासदार सुरेश म्हात्रे म्हणाले की, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि बा पाटलांचे नाव देण्यात विलंब का होतोय? आगरी समाजाचा सन्मान गृहीत धरला गेला आहे. जसा मराठा समाज एकवटला, तसाच आगरी समाजही एकवटून आपला हक्क मिळवेल. मुंबई बंद करण्याची गरज नाही, गावपातळीवर चर्चा करून हा मुद्दा ताकदीनं पुढे न्यायचा आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.