महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर व्यंगचित्राच्या माध्यमातून टीका केली आहे. अलीकडील पहलगाम हल्ला आणि भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी व्यंगचित्र प्रसिद्ध करत सरकारला धारेवर धरले आहे.राज ठाकरे यांनी विचारले की, खरंच कोण विजयी झालं आणि कोण खरंच हरलं? या मार्मिक प्रश्नातून त्यांनी सरकारच्या धोरणांवर आणि सुरक्षा यंत्रणेच्या अपयशावर बोट ठेवले आहे.
भारत-पाक सामन्याच्या उत्साहात देशभरात आनंद साजरा होत असतानाच पहलगाम हल्ल्याने निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीची जाणीव करून देत राज ठाकरेंनी सरकारवर अप्रत्यक्ष फटकारे काढले आहेत.या व्यंगचित्रामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.