Maharashtra politics : महाराष्ट्राचा युपी-बिहार करतायत, राज ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल

Raj Thackeray criticises UP Bihar style politics in Maharashtra : महाराष्ट्रात युपी-बिहारसारखं राजकारण केलं जात असल्याचा आरोप करत मनसे प्रमुख राज ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली.

Raj Thackeray statement on unopposed local body elections : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बंगालमध्ये बिनविरोध झाल्या होत्या. त्यावेळी भाजप कोर्टात गेला होता. तुम्हाला बंगालमध्ये चालत नाही अन् महाराष्ट्रात चालतेय. सत्तेचा आमरपट्टा घेऊन आला नाहीत. आज तुम्ही सत्तेत आला, त्यावेळी काँग्रेसने असं केलं तसं केले तुम्ही सांगता. ज्यावेळी तुम्ही सत्तेतून बाहेर गेल्यावर त्यानंतर येणाऱ्यांनी काही काही बोलले जाईल, त्यावेळी काही बोलू नका. आपण करत असलेली कृती एखादा पायंडा पाडत नाही, याचा विचार सत्ताधाऱ्यांनी करावा, असे राज ठाकरे म्हणाले. उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये जसं राजकारण केले जाते, तसे महाराष्ट्रात केले जातेय. महाराष्ट्र हा सुसंस्कृत आहे. महाराष्ट्राने देशाला दिशा दिली. तुम्ही महाराष्ट्रात युपी बिहारसारखा पायंडा पाडत आहात, सध्याचे राजकारण भविष्यासाठी घातक आहे, असेही राज ठाकरे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com