रायगडच्या पालकमंत्रिपदावरून महायुतीत वादाची ठिणगी पडली आहे. आता त्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्यानं उडी घेतली आहे. रायगडमधील अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे यांच्यावर टीकास्त्र डागलं आहे.
मंत्री भरत गोगावले यांच्यावर अन्याय झाला आहे, अशी सहानुभुती दाखवतानाच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी खासदार सुनील तटकरे यांच्यावर टीका केली. माजी मुख्यमंत्री ए. आर. आंतुले, माणिक जगताप यांच्या यादीत गोगावले यांच नाव जोडत तटकरे यांनी वापर करून सोडून दिल्याचा आरोप चव्हाण यांनी केला आहे. आता सुरू असलेल्या वादावर बोलताना, निवडणुकीला हे एकत्र नांदत होते आणि आता रेड्याची झुंज सुरू असल्याची टीकाही चव्हाण यांनी केली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.