काँग्रेस नेत्या तथा सोलापूरच्या खासदार प्राणिती शिंदे यांनी भाजपवर जहरी टीका केली आहे. आंबेडकर जयंती निमित्त त्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले आणि माध्यमांशी संवाद साधला.
प्राणिती शिंदे म्हणाल्या, हे जे सत्ताधारी आहे त्यांचे एकच काम आहे. लोकांमध्ये पेटवा पेटवी आणि तृष्टीकरण करणे एवढंच यांच काम आहे. महत्वाच्या मुद्याला बाजूला घेऊन भाजपाला फक्त दंगली घडवायच्या आहे. जसं राक्षसाला रक्त पाहिजे असते तसं भाजपला रक्त पाहिजे, अशी जहरी टीका प्राणिती शिंदे यांनी भाजपवर केली. त्या पुढे म्हणाल्या, राज्य दिवाळखोर झाले आहे. पेट्रोल डिझेलच्या किमती वाढल्या असून महागाई वाढली आहे. जेव्हा असे काही होते तेव्हा भाजप या मुद्याला बगल देऊन दंगली घडवण्याचे काम करते असा हल्लाबोल प्राणिती शिंदे यांनी भाजपवर केल्याचे पाहायला मिळाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.