Prakash Ambedkar: सरकार खोट बोलतय; सिंधू नदीचे पाणी बंद केलेले नाही, प्रकाश आंबेडकर यांचा खळबळजनक दावा|VIDEO

Sindhu River Controversy : पहलगाम हल्ल्यानंतर भारत सरकारने कठोर पावले उचलत पाकिस्तानवर कायदेशीर स्ट्राइक करत दणका दिला आहे. मात्र वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी यावर भाष्य करत....

काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर भारताने पाच कठोर निर्णय घेत पाकिस्तानकडे जाणारे सिंधु नदीचे पाणी बंद करण्याची केलेली घोषणा लोकांची दिशाभूल करणारी आहे असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला.

केंद्रीय सचिवांनी पाकिस्तानला लिहिलेल्या पत्राचा दाखला देत प्रकाश आंबेडकर यांनी सरकारच्या भूमिकेवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. पाकिस्तानला पाणी बंद केल्याच्या पत्राचा पुरावा दाखवत या पत्रामध्ये कुठेही पाणी बंद केल्याचा उल्लेख नाहीये. धरणातले पाणी आम्ही सोडणार नाही असा कुठेही उल्लेख नाही. याचाच अर्थ इंडस करार भारत सरकारने रद्द केलेला नाही असा खळबळजनक दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com