उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला लागलेली गळती थांबताना दिसत नाही. विधानसभा निवडणुकीनंतर कोकणात तर पानगळतीचा हंगाम सुरू झाला आहे. अशावेळी डॅमेज कंट्रोलसाठी ठाकरेंनी मंथन सुरू केलं आहे. आता भाकरी फिरण्याची वेळ असताना, ठाकरेंनी थेट भाकरी उलथवण्यासाठी मास्टरप्लान केला आहे. ठाकरेंच्या या एका पावलानं महाराष्ट्राचं राजकारण ३६० डीग्री फिरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
शिवसेना भवनात ठाकरे गटाची एक महत्वाची बैठक झाली. ठाकरे गटातून महत्वाचे नेते, पदाधिकारी बाहेर पडत आहेत. अलीकडेच माजी आमदार राजन साळवींनी जय महाराष्ट्र केला आहे.
याच पार्श्वभूमीवर ठाकरेंकडून बैठका घेतल्या जात आहेत. डॅमेज कंट्रोल रोखण्यासाठी दर आठवड्याला बैठक घेतली जाणार आहेत. दरम्यान, शिवसेना भवनात बैठकीला संजय राऊत, अंबादास दानवे, अनिल देसाई, विनायक राऊत, अनिल परब आदी महत्वाचे नेते उपस्थित होते. पक्षसंघटनेसाठी दर मंगळवारी आता दर मंगळवारी बैठक घेतली जाणार आहे. आगामी महापालिका निवडणुकांआधीच उद्धव ठाकरे सावध झाले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.