पहलगाम हल्ल्यानंतर भारताने सिंदूर ऑपरेशन राबवत पाकिस्तानची झोपच उडवली. या सिंदूर ऑपरेशनने संपूर्ण देश हादरला आणि आंतराष्ट्रीय पातळीवर देखील पाकिस्तानला तोंडघशी पाडले. या ऑपरेशन आधी पंतप्रधान मोदी यांनी सलग पंधरा दिवस बैठकींचे सत्र सुरू ठेवले. या पार पडलेल्या बैठकीत तिनही दलाचे प्रमुख, संरक्षण मंत्री आणि केंद्रीय गृहमंत्री हे उपस्थित होते. पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्याआधी सरकारने सर्वपक्षीय बैठक घेऊन याबाबत सर्वांचे मत जाणून घेतले होते. भारताने पाकिस्तानच्या कोणत्याही सामान्य लोकांना लक्ष न करता दहशतवादी अड्डे हे उद्धवस्त लावले. मात्र तरी देखील पाकिस्तानने भारतीय लोकांना लक्ष करत त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. यानंतर भारताने त्यांचे सर्व डाव हे हवेतच हाणून पाडले. मागच्या काही दिवसांपासून दोनही देशातील
तणाव हा वाढतच चालला होता. यामुळे अखेर अमेरिकेने मध्यस्थी करत या युद्धाला विराम दिला. अशातच यानंतर पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तिन्ही दलाच्या प्रमुखांसोबत बैठक सुरू झाली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.