शरद पवार यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार निलेश लंके यांनी केली आहे. कृषी आणि औद्योगिक क्षेत्रातील पवारांचे योगदान पाहता हा सन्मान त्यांना मिळायला हवा असे त्यांनी म्हटले आहे. यासाठी दोन दिवसांत पत्रव्यवहार करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवण्यात पवारांचा मोठा वाटा असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. शेतकरी, औद्योगिक किंवा देशाच्या महत्वाच्या निर्णय प्रक्रियेमध्ये साहेबांचा एक सिंहाचा वाटा होता. त्यामुळे ही सामान्य जनतेची मागणी आहे. शेतकऱ्यांच्या जीवनात अमोलाग्र बदल जर कोणी केला असेल तर ते शरद पवारांनी केले आहे. त्यामुळे सरकारने ही मागणी मान्य केली पाहिजे असे निलेश लंके यांनी केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.