दिल्लीतील आंदोलनाची धग आता देशभरात पोहोचली असून तरुणाईला मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळताना दिसत आहे. जंतर मंतरवर कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलन अजुनही सुरू असून जो पर्यंत शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेत नाही तो पर्यंत हे आंदोलन सुरूच राहील असा निर्धार अभिजीत दीपके यांनी व्यक्त केला आहे. येत्या 26 जुलैला राज आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये मुंबईमध्ये मोर्चा निघणार आहे. तत्पूर्वी अमित आणि आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात दादर येथील छत्रपती शिवाजी पार्क मैदानात मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरू झाले असून यामध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी सामील झाले असून तिरंगा झेंडा आणि देशभक्तीचे गाण्याने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला आहे. मनसे आणि ठाकरे गटाचे अनेक प्रमुख नेते याठिकाणी उपस्थित असून आदित्य आणि अमित ठाकरे यांनी यावेळी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.