Mumbai Rain: मुंबईतील सरकारी कर्मचाऱ्यांना घरी जाण्याची परवानगी|VIDEO

Mumbai Monsoon Chaos: मुंबईत सुरू असलेल्या जोरदार पावसाच्या पार्श्वभूमीवर सरकारने तातडीने निर्णय घेऊन मंत्रालयातील सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना संध्याकाळी चार वाजताच घरी पाठवले आहे

राज्यातील अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत आहे. मुंबईतही मध्यरात्रीपासून पावसाने तुफान बॅटिंग सुरु केली आहे. त्यामुळे नागरिकांचे चांगलीच तारांबळ उडाली आहे. मुंबईसह ठाणे, रायगड, नवी मुंबई या ठिकाणी 24 तासात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे.

याच पार्श्वभूमीवर आज मुंबईमध्ये जोरदार पाऊस सुरू झाल्याने लोकलची सेवा देखील विस्कळीत झाल्याचे दिसून आले. यानंतर मंत्रालयातील सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना संध्याकाळी चार वाजताच घरी रवाना करण्यात आले आहे. मुंबईतील पावसाचा परिणाम लोकल सेवेवर झाला असून यामुळे नागरिकांचे हाल होऊ नये त्यासाठी सरकारने सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना लवकर घरी पाठवले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com