Maratha Protest: मुंबईतील मराठा आंदोलकांसाठी 12 टन फरसाण रवाना|VIDEO

12 Tons Farsan Sent From Ahmednagar: मुंबईतील मराठा आंदोलकांसाठी अहमदनगर जिल्ह्यातून तब्बल १२ टन फरसाण व पाण्याच्या बाटल्या रवाना करण्यात आल्या आहेत.
Summary

मुंबईतील मराठा आंदोलकांसाठी १२ टन फरसाण व पाण्याच्या बाटल्या अहमदनगर जिल्ह्यातून पाठवले

आंदोलकांना अन्न-पाण्याची कमतरता भासू नये म्हणून मराठा बांधव पुढे सरसावले

सरकारकडून अडथळे येऊनही समाजाने अन्नपूर्णाचे काम हाती घेतले

आरक्षण मिळेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा ठाम निर्धार व्यक्त

मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मुंबईमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाचे आंदोलन सुरू असून आंदोलनाचा हा दुसरा दिवस आहे. मात्र काही ठिकाणी हॉटेल बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे अनेक मराठा आंदोलकांना खाण्यापिण्याची समस्या निर्माण झाल्यामुळे आता संपूर्ण महाराष्ट्रातून मुंबईकडे आंदोलकांसाठी विविध प्रकारे खाण्यापिण्याचे सामान पाठवण्यात येत असून अहिल्यानगर जिल्ह्यातून जवळपास 10 ते 12 टन फरसाण पाण्याच्या बाटल्या आज मराठा बांधवांसाठी पाठवण्यात आले. मराठा आंदोलकांना कोणतेही सामन अपुरे पडू देणार नाही असा निश्चय मराठा बांधवांनी केला असून मुंबई बाहेर राहिलेल्या सर्व समाज बांधवांनी आंदोलनात असलेल्या बांधवांना अन्नपूर्णाचे काम सुरू केले. सरकार कितीही त्रास देत असेल तरी आरक्षण मिळेपर्यंत आंदोलन हे चालूच राहणार असा ठाम निश्चय आता समाज बांधवांनी केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com