TB Disease | Health Alert : राज्यातील सर्वांची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. कारण, महाराष्ट्राला टीबीचा विळखा बसलाय आहे. राज्यातील ११ हजारांपेक्षा जास्त गावे हाय रिस्कवर असल्याची माहिती समोर आली आहे. केंद्र सरकारच्या एका विशेष मोहिमेत हे वास्तव समोर आले आहे. Maharashtra TB high risk villages latest news
महाराष्ट्रावर आता टीबीचं मोठं संकट घोंघावतंय. केंद्र सरकारच्या 100 दिवसांच्या विशेष मोहिमेत हे धक्कादायक वास्तव समोर आलंय. राज्यातील तब्बल 11 हजार गावं हाय रिस्कवर आहेत. त्यामुळे जवळपास दीड कोटी लोकांची आरोग्य तपासणी करण्याचे उद्दिष्ट आहे. अवघ्या 35 दिवसांत 6 हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळल्यानं चिंतेत भर पडली आहे. प्रशासनानं 14 वर्षांवरील प्रत्येकाची तपासणी करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे राज्यभर हाय अलर्ट जारी करण्यात आलाय.
राज्यातील सुमारे १.५ कोटी लोकांची आरोग्य तपासणी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. जोखीमग्रस्त भागातील १४ वर्षांवरील प्रत्येक व्यक्तीची अनिवार्यपणे तपासणी केली जाणार आहे. २४ मार्च २०२६ पासून सुरू झालेल्या या मोहिमेच्या पहिल्या ३५ दिवसांतच राज्यात ६,१११ नवे रुग्ण आढळले असून त्यांची नोंद 'निक्षय' (Ni-kshay) पोर्टलवर करण्यात आली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.