सरकारनं शेतकऱ्यांसाठी सुरू केलेल्या एका रुपयांत पीक विमा योजनेत राज्यातील काही जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे उघडकीस आल्यानंतर ही योजनाच गुंडाळण्यात येणार की काय अशी शंका व्यक्त केली जात होती. या योजनेवरून विरोधकांनीही सरकारवर टीकेची झोड उठवली होती. तसेच ही योजना गुंडाळण्याची शक्यता वाटल्यानं शेतकरी चिंतेत होते. पण आता निराश झालेल्या शेतकऱ्यांसाठी महत्वाची अपडेट समोर आली आहे. एका रुपयात पीक विमा योजनेत फेररचना करण्यात येणार आहे, असे सांगण्यात येत आहे.
एका रुपयात पीक विमा योजनेची फेररचना आणि फेरबदल करण्यात येणार आहे. या योजनेत झालेला भ्रष्टाचार आणि गैरप्रकाराचे कारण यामागे देण्यात आले आहे. लवकरच पीक विमा योजनेची फेररचना करण्यात येणार आहे, असे मंत्रालयातील उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले. आता या योजनेत नेमके कोणते बदल होणार आहेत, निकष कोणते असणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. भ्रष्टाचार आणि गैरप्रकारांमुळं ही योजनाच गुंडाळण्यात येणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. मात्र, ही योजना बंद करण्यात येणार नसून, तिची फेररचना करण्याचे संकेत देण्यात आले आहेत. त्यामुळे एकप्रकारे हा शेतकऱ्यांसाठी दिलासा आहे, असे मानले जात आहे. गेल्या पाच वर्षांत राज्यातील विमा कंपन्यांना साडेदहा हजार कोटींना नफा झाला आहे. तो नफा शेतकऱ्यांना मिळत नसल्याचे कारण देखील देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.