मुंबई: विधानपरिषद निवडणुकीमध्ये जयंत पाटील पराभूत झालेत. यानंतर कॉंग्रेसची चार मतं फुटल्याचा आरोप देखील केला जातोय. या पार्श्वभूमीवर कॉंग्रेस कारवाई देखील करणार आहे. अशातच आता विधानपरिषदेत काँग्रेसच्या वरिष्ठांमध्येच दोन गट पडल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगलेली आहे. मिलिंद नार्वेकर आणि जयंत पाटील यांच्यावरून ही चर्चा रंगल्याची शक्यता वर्तविली जात आहे. विश्वासार्ह आमदारांची मतं वळविण्याचा ठाकरेंचा आग्रह असल्याची चर्चा देखील समोर येतेय. दरम्यान फुटीर आमदारांना ट्रकभरून पैसे दिल्याचा आरोप क्रॉस वोटिंगवरून संजय राऊतांनी केलाय. विधानपरिषदेत महायुतीच्या नऊ उमेदवारांचा विजय झालाय, तर महाविकास आघाडीच्या दोन उमेदवारांचा विजय झालेला आहे. कॉंग्रेसमधील काही आमदारांची मतं फुटल्याचा आरोप देखील केला जातोय, या अनुषंगाने कॉंग्रेस कारवाई करणार असल्याची माहिती मिळतेय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.