राज्यातील अतिवृष्टीग्रस्त आणि पूरपरिस्थितीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी शासनाने जाहीर केलेल्या पॅकेजमधील तब्बल ३५५ कोटी रुपयांची मदत अद्यापही सरकारी तिजोरीतच पडून आहे. ई-केवायसी आणि विविध तांत्रिक कारणांमुळे राज्यातील जवळपास पाच लाख शेतकऱ्यांना ही मदत मिळू शकलेली नाही. मुख्य सचिवांनी घेतलेल्या आढाव्यानंतर ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामध्ये नाशिक विभागात ५० कोटी २१ लाख, नागपूरमध्ये ३३ कोटी १ लाख, अमरावतीत ८३ कोटी १ लाख, तर छत्रपती संभाजीनगरमध्ये १६५ कोटी ७२ लाख रुपयांची मदत प्रलंबित आहे. पुण्यात २० कोटी २९ लाख आणि कोकणात ३ कोटी २७ लाख रुपये वितरीत झालेले नाहीत. शासनाने ३१,६२८ कोटींचे पॅकेज जाहीर केले होते, मात्र तांत्रिक अडचणींमुळे लाखो शेतकरी मदतीपासून वंचित राहिले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.