आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारच्या मंत्रिमंडळामध्ये फेरबदल केले जाऊ शकता अशी माहिती राजकीय सूत्रांनी दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून महायुतीचे अनेक मंत्री वादाच्या कचाट्यात सापडत आहे. शिंदेसेनेचे काही मंत्री हे वादग्रस्त विधान करत आहे तर काहीजन हे भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली आहे. अजित पवार गटाचे देखील मंत्री हे शेतकऱ्यांच्या भावना दुखावतील असे वक्तव्य केल्याने नाराजीचा सुर उमटला आहे. काही मंत्र्यांचे काम व्यवस्थित नसल्याने त्यांना देखील डच्चू मिळणार असून आता काही तरुण आमदारांना यामध्ये संधी दिली जाणार आहे. मात्र आता कोणाची या मंत्रिमंडळातून हाकालपट्टी केली जाते आणि कोणाला संधी दिली जाते हे पाहणे महत्वाचे राहणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.