संसद तसंच विधिमंडळाच्या अंदाज समितीचे अध्यक्ष आणि सदस्यांसाठी चक्क चांदीच्या थाळीतून पंचपक्वान्नचा बेत करण्यात आला होता. यासाठी चांदीच्या एका थाळीचं भाडं होतं 550 रुपये तर भोजन होते. 4 हजार रुपयांचे. म्हणजेच एका खासदार किंवा आमदाराच्या भोजनावर राज्य विधिमंडळानं साडेचार हजार रुपये खर्च केले आहे. संसद आणि राज्य विधिमंडळातील अंदाज समिती त्यांचे अध्यक्ष आणि सदस्यांच्या 2 दिवसीय राष्ट्रीय परिषदेचा मंगळवारी मुंबईत समारोप झाला. अर्थसंकल्पातील तरतुदींचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी काटकसरीच्या शिफारशी करण्याची जबाबदारी ज्या अंदाज समितीवर असते. त्या समितीच्या परिषदेत चांदीच्या ताटातून पंचपकवान देत राज्य निधीची उधळपट्टी करण्यात आल्याचा आरोप होत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.