लोकशाहीचे मंदीर असणाऱ्या विधिमंडळामध्ये गुरुवारी भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. या घटनेने सरकारला शरमेने मान खाली घालावी लागली. याबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज सभागृहात भाष्य केले. यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी आपल्याला जीवे मारण्याची धमकी आल्याचा मुद्दा उपस्थित केला.
मात्र, विधानसभा अध्यक्षांनी मांडलेल्या प्रस्तावाचा आणि आव्हाडांच्या धमकीचा मुद्याचा एकमेकांची संबंध नाही. असा आक्षेप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला. यावरून विरोधकांनी गदारोळ करताच फडणवीस संतापल्याचे पाहायला मिळाले. धमकीचा उल्लेख करायला कोणाची मनाई नाहीये. अध्यक्षांनी एखादा प्रस्ताव मंडल्यानंतर कधीतरी आपण राजकरणापलीकडे जाणार आहात का नाही? धमकीचा विषय वेगळा मांडता येईल. कालच्या घटनेने कोणा एका व्यक्तीची प्रतिष्ठा खराब झालेली नाहीये, त्या एकट्या पडळकर किंवा यांच्या माणसाला पडत नाही. आपल्या सगळ्यांच्या नावाने या ठिकाणी बोलले जातय हे सगळे आमदार माजले आहेत अशी भावना लोकांमध्ये आहे असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.