Subodh Savji : खरंच शासन भिकारी आहे? माजी मंत्री सुबोध सावजी यांचं मुख्यमंत्र्यांना खरमरीत पत्र! | VIDEO

Manikrao Kokate : कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी पत्रकार परिषदेत पिक विम्याच्या बाबतीत बोलताना " सरकार भिकारी आहे.!"असं म्हटलं होतं. त्यावर माजी मंत्री सुबोध सावजी यांनी कृषिमंत्र्यांच्या वक्तव्याबाबत मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण द्यावं अशी मागणी केली आहे.

कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी पत्रकार परिषदेत पिक विम्याच्या बाबतीत बोलताना " सरकार भिकारी आहे.!"असं म्हटलं होतं. त्यावर माजी मंत्री सुबोध सावजी यांनी कृषिमंत्र्यांच्या वक्तव्याबाबत मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण द्यावं अशी मागणी करत मुख्यमंत्र्यांना खरमरीत पत्र लिहिल आहे. सुबोध सावजी यांनी म्हटल आहे की, कृषिमंत्र्यांनी सरकार भिकारी आहे हे वक्तव्य केलं आहे. हे आता खरं वाटायला लागलं आहे.

कारण सरकारने निवडणुकांपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ, लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये ऐवजी 2100 रुपये देऊ असं म्हटलं होतं. तर राज्यातील अनेक सुरू असलेल्या योजना बंद पडल्या आहेत. त्यामुळे सरकार हे भिकारी आहे हे कृषीमंत्र्यांच वक्तव्य आता खरं वाटू लागल आहे. त्यामुळे या वक्तव्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण द्यावं अशी मागणी देखील माजी मंत्री सुबोध सावजी यांनी आपल्या पत्रात केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com