Jayant Patil News : शिंदे, फडणवीसांना जयंत पाटलांचा टोला, म्हणाले.. |Marathi News

Maharashtra Assembly Special Session : महाराष्ट्र विधानसभेचे विशेष तीन दिवशीय अधिवेशन सध्या सुरू आहे. यात जयंत पाटील यांनी आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे.

सत्ताधारी पक्षाकडे 230 आमदार आहेत. त्यांनी केवळ तेवढंच नाही तर 288 आमदार त्यांचेच असल्याचे मानावं. मी पुन्हा येईल, असं म्हणणारे देवेंद्र फडणवीस खरंच पुन्हा आलेत. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं भाषण आज सभागृहात झालं. मात्र पहिल्यापेक्षा दुसरे भाषण मुख्यमंत्र्याचं वाटलं, असं म्हणत राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना टोला लगावला आहे.

महाराष्ट्र विधानसभेचं विशेष अधिवेशन सध्या सुरू आहे. या अधिवेशनाचा तिसरा शेवटचा दिवस आहे. यावेळी विधानसभा अध्यक्षांची निवड करून विधानसभा अस्तित्वात आणण्यात आली. भाजपचे राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली आहे. त्यानंतर आपल्या भाषणातून जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसोबत राहुल नार्वेकर यांच्यावर टीकेची झोड उठवली.

पुढे बोलताना जयंत पाटील म्हणाले की, सत्ताधारी पक्षाकडे 230 आमदार आहेत. त्यांनी केवळ तेवढंच नाही तर 288 आमदार त्यांचेच असल्याचं मानावं. पुन्हा संधी आली तर मंत्री व्हा, असं मी नार्वेकरांना सांगत होतो. मात्र, ते पुन्हा अध्यक्ष झाले. नार्वेकरांनी दिलेल्या निकालावर अद्याप सर्वोच्च न्यायालयाला देखील काहीही बोलता आलं नाही. मागच्या वेळी नार्वेकरांनी न्यायायल म्हणूनच जास्त काम केल्याचा उल्लेख ज्यांनी केला. त्या सुनावणीदरम्यान नार्वेकरांनी आम्हालाही सर्वतोपरी सहकार्य केल्याचा उल्लेख देखील जयंत पाटील यांनी यावेळी बोलताना केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com