India Pakistan Tension: पाकच्या सियालकोटवर जोरदार हल्ला; दहशतवाद्यांचे लाँच पॅड, चौक्या उद्ध्वस्त|VIDEO

Operation Sindoor: भारत आणि पाकिस्तानमध्ये सध्या युद्धजन्य परिस्थिति निर्माण झाली आहे. भारताने पाकिस्तानचे सर्व ड्रोन हल्ले हाणून पाडल्यानंतर पाकिस्तानचे धाबे दणाणले आहे.

भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानने अचानक भारतावर हल्ले सुरू केले असून, भारताने देखील हे हल्ले हाणून पाडले. विशेष म्हणजे, भारताने पाकिस्तानच्या लाहोर आणि सियालकोटवरही हल्ले सुरू केले आहेत. पाकिस्तानने भारतातील जम्मू, पंजाब राजस्थानमध्ये केलेल्या हल्ल्याला चोख उत्तर म्हणून भारताने लाहोर आणि सियालकोटवर क्षेपणास्त्र डागली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी अंधार पडताच पाकिस्तानने सीमेजवळील भारतातील विविध शहरांमध्ये 100 हून अधिक क्षेपणास्त्र डागली आहेत. पाकिस्तानने फक्त राजस्थानच्या जैसलमेरमध्ये 70 हून अधिक क्षेपणास्त्र हल्ले केले. मात्र भारताच्या हवाई संरक्षण यंत्रणेने पाकिस्तानची सर्व क्षेपणास्त्रे हवेतच हाणून पाडली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com