Bangladesh Violence: बांगलादेश हिंसाचाराचा भारतातील शेतकऱ्यांना फटका; कांदा निर्यातीचे शेकडो ट्रक अडकले, VIDEO

India Bangladesh Border Sealed Onion Export Issue: बांगलादेशमधील हिंसाचार वाढत असल्यामुळे भारत-बांग्लादेश सीमा सील करण्यात आलीय. त्यामुळे शेकडो ट्रक बॉर्डरवर अडकले आहेत.

मुंबई : बांगलादेशमधील हिंसाचाराचा फटका भारतातील कांदा निर्यातीला बसला आहे. नाशिकमधून रोज ५० ते ६० ट्रक कांदा बांगलादेशला निर्यात होतो. बांगलादेशमधील अराजकतेमुळे भारताने सीमा सील केलीय. त्यामुळे भारत बांगलादेश सीमेवर कांदा निर्यातीचे शेकडो ट्रक अडकल्याची माहिती समोर येत आहे. बांगलादेशमध्ये ५० हजार टन कांद्याची निर्यातीसाठी केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वी परवानगी दिली होती.

मात्र, सीमा सील झाल्यानं शेकडो कांद्याचे ट्रक सीमेवर अडकले आहेत. त्यामुळे कोट्यावधीचे व्यवहार ठप्प झाले आहेत. बांगलादेश भारताकडून जवळपास ७५ टक्के शेतमाल आयात करत आहे. सीमा सुरु होण्यासाठी अजून पाच ते सहा दिवस लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कोट्यवधी रूपयांचा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे. देशांतर्गत बाजारपेठेत कांद्याच्या दरावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे शेतमालांच्या निर्यातीला देखील मोठा फटका बसणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com