Maharashtra Rain : अवकाळीने शेतकरी राजा कोलमडला, ३ दिवस या जिल्ह्यात पावसाचा इशारा

Maharashtra Rain Alert: महाराष्ट्रात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे. पुढील तीन दिवस वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा असून, कांदा, सोयाबीन आणि कापूस पिकांचे नुकसान झालं आहे.

Maharashtra unseasonal rain alert October 2025 IMD report : मान्सून महाराष्ट्रातून माघारी परतला आहे, पण पाऊस मात्र तसाच आहे. अवकाळी पावसामुळे राज्यातील बळीराजा कोलमडला आहे. पुढील 2 ते 3 दिवस राज्यातील अनेक भागांत वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आलाय. बंगालच्या उपसागरात कमी दाबाची क्षेत्र सक्रिय झाल्यामुळे पावसाची शक्यता वर्तवण्यात आलाय...गेल्या दोन दिवस सुरु असलेल्या पावसामुळे कांदा, सोयाबीन, वेचणीवर आलेला कापूस, मका, टोमॅटो, भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झालंय..तर रायगडमधील भातकापणी ठप्प पडली.

विजांसह पावसाची शक्यता

पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नंदूरबार, धुळे, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com