ICICI बँकेचा ग्राहकांना जबर दणका, अर्धा लाख रूपये मिनिमम बॅलेन्स ठेवावा लागणार

ICICI Bank Shocks Customers: Minimum Balance Hiked to ₹50,000 : आयसीआयसीआय बँकेचा नवीन नियम , बचत खात्यात किमान सरासरी शिल्लक ५० हजार रुपये ठेवावी लागेल.

ICICI बँकेने ग्राहकांना मोठा दणका दिला आहे. बँकेनं बचत खात्यांमध्ये किमान सरासरी शिल्लक रक्कम किती ठेवायची याबाबतचे नियम बदलले आहेत. यामध्ये तब्बल पाच पट वाढ केली आहे. बचत खात्यामध्ये मिनिमम बॅलेन्स तब्बल ५० हजार रूपये ठेवावा, असा नियम बँकेने केला आहे. यामुळे आता ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली आहे. मेट्रो, शहरी आणि ग्रामीण भागात हे नियम 1 ऑगस्टपासून लागू झालाय...

आयसीआयसीआय बँकेकडून करण्यात आलेले बदल 1 ऑगस्ट 2025 नंतर उघडण्यात आलेल्या बँक खात्यांना लागू असतील. जे बँक खातेदार किमान सरासरी शिल्लक रक्कम त्यांच्यात खात्यात ठेवणार नाहीत, त्यांना बँकेकडून 6 टक्के दंड किंवा 500 रुपये जी कमी रक्कम असेल तितकं शुल्क आकारलं जाणार आहे.. त्यामुळे ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com