भरत मोहळकर, साम टीव्ही
विधानसभा निवडणुकीत टीकेचा स्तर टोकाला गेला होता. त्यातच विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान तू राहशील किंवा मी राहीन, असं म्हणत देवेंद्र फडणवीसांना इशारा दिला होता. त्याबाबत दाक्षिणात्य राज्यातील राजकीय सुडाचा संदर्भ देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी संयमी उत्तर दिलंय.. तर महाराष्ट्राची राजकीय परंपरा आणि संवाद जपण्याचा विश्वासही व्यक्त केलाय.
देवेंद्र फडणवीसांच्या संयमी उत्तरानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही सारवासारव करण्याचा प्रयत्न केलाय. प्र. के अत्रे, यशवंतराव चव्हाण, एस. एम जोशींसारख्यासारख्या दिग्गजांचा महाराष्ट्राला समृद्ध राजकीय वारसा आहे. मात्र सध्या टोकाची टीका आणि संपवण्याची भाषा करण्यात येतेय... त्यामुळे सर्वपक्षीय नेत्यांनी महाराष्ट्राची राजकीय संवादाची समृद्ध परंपरा जपायला हवी.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.