Mahrashtra Budget: कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू येणार, सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

Eknath Shinde statement: राज्य सरकारचा अर्थसंकल्प सादर झाला यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांबाबत मोठे विधान केले.

राज्याचा अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते छगन भुजबळ हे छगन भुजबळ हे आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.कांद्यावरील 20 टक्के निर्यात शुल्क रद्द करा, या मागणीसाठी लासलगाव कृषि उत्पन्न बाजार समितीत शेतकरी हे आक्रमक झाले आहे. बाजार समितीत कांदा लिलाव बंद पडले असून शेतकरी हे संतप्त झाले आहे. यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले कांद्याचा प्रश्न हा अत्यंत महत्वाचा आहे. तसेच कांदा हा प्रश्न हा शेतकऱ्यांसाठी जिव्हाळ्याचा आहे.

भारताची कांदा पिकवण्याची क्षमता 60 टक्के आहे आणि त्यामध्ये 40 टक्के हा महाराष्ट्राचा वाटा आहे.गेलयावेळी असा प्रसंग आला होता त्यावेळेस आम्ही पीयूष गोयल यांना भेटलो आणि 40 टक्के निर्यात करवरून 20 टक्के दर करायला विनंती केली होती.आपल्याला एवढेच सांगतो की, हा प्रश्न केंद्र सरकारशी निगडीत आहे. आपण अमित शहा यांची भेट घेऊन कायमचा हा प्रश्न निकाली काढू असे एकनाथ शिंदे यांनी आश्वासन दिले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com