Eknath Shinde: आमच्या सरकारच्या काळात लाभार्थ्यांमध्ये मोठी वाढ झाली; CM शिंदे यांनी आकडेवारी सांगितली

Eknath Shinde on farmers issue: आमच्या सरकारच्या काळात लाभार्थ्यांमध्ये मोठी वाढ झाली, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. तसेच यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी आकडेवारी देखील सांगितली.

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांच्या मुद्यावर विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात मोठं भाष्य केलं आहे. महाविकास आघाडीच्या तुलनेत महायुतीने चांगले काम केल्याचं मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, 'महाविकास आघाडीच्या तुलनेने महायुती शासनाने चांगले निर्णय घेतले. मागील सरकारच्या काळात कृषी यांत्रिकीकरण, फलोत्पदन,सिंचन, एससी एसटी योजना, शेतकऱ्यांची योजना, पिक विमा योजनांमधून शेतकऱ्यांना ७ हजार ८० कोटी रुपयांचा लाभ डीबीटी मार्फत मिळाला. तर आमच्या दोन वर्षांच्या सरकारच्या काळात शेतकऱ्यांना ११ लाख ११ हजार ३९२ कोटींचा लाभ मिळाला आहे. आमच्या सरकारच्या काळात ९५ टक्के लाभार्थी वाढले. तर शेतकऱ्यांना दिलेल्या अनुदानात ६१ टक्के वाढ झाली आहे'.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com