शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार? या केंद्रीय मंत्र्याचं सूचक विधान|VIDEO
कफ सिरपमुळे बालकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यावर ते म्हणाले, अशा औषधांवर सर्व राज्यांनी बंदी घालावी असे निर्देश केंद्र सरकारने दिले आहेत. अन्न आणि औषध विभागाकडून तशी कारवाई सुरू झाली असून, देशात आतापर्यंत १८ बालकांचा यामुळे मृत्यू झालाय ही दुर्दैवी बाब आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल अशी ग्वाही यावेळी त्यांनी दिली.
निधी वाटपावरून शिंदेच्या शिवसेनेचे आमदार पुन्हा नाराज असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. यावर विचारले असता जाधव म्हणाले, आपल्या मतदार संघातील कामासाठी प्रत्येकाच्या अपेक्षा असतात, यामध्ये कमी जास्त काही झालं असेल तर वरिष्ठ नेते बसून चर्चा करतील...
तसेच कर्जमाफीवर त्यांनी सकारात्मक विधान केल्याचे दिसून आले. अतिशय मोकळ्या हाताने मदत करण्याची सरकारची मानसिकता आहे, केंद्र सरकार कडून देखील मदत होणार आहे. दिवाळीपूर्वी मदत नुकसानग्रस्तांना मिळणार आहे. तर कर्जमुक्तीचा निर्णय तडकाफडकी घेतला जात नाही, सर्व बाबतीत विचार करून योग्य वेळी कर्जमाफीचा निर्णय सरकार घेईल. असे आश्वासन यावेळी त्यांनी दिले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.