राज्यात महापालिका निवडणुकीचा बिगूल हा येत्या काही महिन्यातच वाजू शकतो. मात्र या निवडणुकीआधी महायुतीमध्ये मोठी धूसपुस पाहायला मिळत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आणि मंत्री गणेश नाईक यांच्यातील वाद हा सर्वश्रुत आहे. अशातच गणेश नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत नवी मुंबईमध्ये भाजपची बैठक पार पडली. या बैठकीत भाजपने स्वबळाचा नारा दिला आहे. तसेच वरिष्ठ पातळीवर जो निर्णय आम्हाला मान्य असेल मात्र नवी मुंबईत आमची ताकद आहे.
त्यामुळे नवी मुंबईत भाजपची सत्ता यावी यादृष्टीने आम्ही वरिष्ठांना कळविले आहे. भाजपची स्वबळावर लढवण्याची तयारी आहे स्पष्ट संकेत माजी खासदार भाजपा नेते संजीव नाईक यांनी दिले. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वनमंत्री गणेश नाईक यांनी सुद्धा नवी मुंबई प्रश्नांवर बैठक आयोजित करण्यात आली होती त्यात महत्वाचे निर्णय घेतले आहे, त्यांची सुद्धा अंमलबजावणी केली जाईल असे ही ते म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.