जालना जिल्ह्यातील भोकरदन येथे आज सकल हिंदू समाजाच्या वतीने आक्रोश सभेचे आयोजन करण्यात आलं या सभेमध्ये कीर्तनकार संग्राम बापू भंडारे यांनी वादग्रस्त विधान केले असून गावात जय श्रीरामच्या घोषणा दिल्यामुळे गुन्हे दाखल होत असतील तर स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या दुसऱ्या रामाच्या घोषणा द्या तसेच गावागावात लॉरेन्स् बिष्णोई तयार व्हायला पाहिजे अस वादग्रस्त विधान केलंय.
या कार्यक्रमाला आमदार संग्राम जगताप देखील उपस्थित होते. ज्यांनी गोहत्या आणि गौतस्करी करणाऱ्यावरती मोकोका प्रमाणे कारवाई व्हावी तसेच हत्या झालेल्या ठिकाणच्या पोलीस अधिकाऱ्याचा निलंबन करावे अशी देखील मागणी आमदार जगताप यांनी केली आहे. जालना जिल्ह्यातील प्रसिद्ध आन्वा गावातील मंदिरात गोमांस टाकल्या प्रकरणी भोकरदन येथे निषेध म्हणून तसेच पोलिसांनी या प्रकरणी चुकीच्या व्यक्तीला गोवल्याचा आरोप करत या ठिकाणी सकल हिंदू समाजाच्या वतीने आक्रोश मोर्चाच आयोजन करण्यात आलं होतं यावेळी ते बोलत होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.