बीड: संतोष देशमुख हत्या प्रकरणाने गाजत असलेल्या बीड जिल्ह्यात ड्युटी नको रे बाबा असे म्हणत जिल्ह्यातील 107 पोलीस अधिकाऱ्यांनी बदलीसाठी विनंती अर्ज केला आहे.. त्यामुळे बीडच्या पोलिस दलात खळबळ उडाली असून नेमकं बीड जिल्ह्यात आहे तरी काय ज्यामुळे पोलीस अधिकारी ड्युटी करायचं नको म्हणत आहेत .असा प्रश्न उपस्थित केला जात आहे? तसचं उपमुख्यमंत्री अजित दादा पवार पालकमंत्री असलेल्यां बीड जिल्ह्यात का नको? या अगोदर अनेक अधिकाऱ्यांची बीड जिल्ह्यासाठी पसंती होती मात्र अचानकच बदलीसाठी विनंती अर्ज आल्याने चर्चा होत आहे.. अजित दादा यांनी पालकमंत्री पदाची चुकीची गोष्ट खपवून घेतली जाणार नाही असा सज्जड दम आहे दिला होता.
संतोष देशमुख हत्या प्रकरण, लोकसभा विधानसभा निवडणुकीमुळे वाढलेला जातिवाद, त्यातून होणारे आरोप प्रत्यारोप यामुळे बीड जिल्हाच नको असे काही अधिकारी खासगीत नको म्हणत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.