नागपंचमीच्या पवित्र दिवशी हरित क्रांतीचे प्रणेते आणि माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या गहूली येथील समारकस्थळी झालेली चिंतन बैठक आणि रक्तदान शिबिर हे सरकारच्या डोळे उघडवण्यासाठी नव्हे, तर त्याच्या राजकीय पायाखालची जमीन हादरवण्यासाठीच आहे.हरित क्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांच्या स्मृतीस्थळी जमलेले शेतकरी नेते, कार्यकर्ते आणि तळमळीचे शेतकरी, हे केवळ भावना व्यक्त करण्यासाठी नव्हते, हे एक राजकीय विद्रोहाचं रणसंग्राम शंखनाद होतं.शेतकरी रक्तदान करतोय,पण सरकारचे मन अजूनही काळं आहे.शेतकरी नेते बच्चू कडू यांनी आपल्या भाषणात सरकारवर थेट युद्धाची भाषा केली.श्रीकृष्णाने कालिया नागाला ठेचलं, आम्ही आता शेतकऱ्यांना गिळणाऱ्या नागधोरणाला ठेचणार..
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.